Pension : पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा महत्त्वपूर्ण निर्णय !

Spread the love

शासकीय सेवेमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान राखण्यासाठी पेन्शन अत्यावश्यक असलेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे . सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निकालामध्ये असे स्पष्ट केले की , पेन्शन ही इच्छाच्या आधारावर दिलेली रक्कम नसून ती सामाजिक कल्याणाच्या आणि संकटाच्या वेळी आवश्यक मदतीची पायरी असल्याचे स्पष्ट केले , त्यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारता येणार नाही ,असेही यावेळी स्पष्ट करण्यात आली आहे .

कर्मचारी निवृत्तीनंतर केवळ पेन्शनच्या मदतीनेच सन्मानपूर्वक पुढील आयुष्य जीवन जगेल , त्यामुळे त्याला पेन्शन नाकारता येणार नाही असे यामध्ये निकाल देताना न्यायमूर्ती एस के कौल , न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल बुधवारी दिला आहे .

हे पण वाचा : आता कर्मचाऱ्यांना मिळणार या नवीन नियमाप्रमाणे पेन्शन .

यासंदर्भात दाखल केलेल्या माजी कर्मचारी याचिकाकर्त्यांना 13 वर्षांची थकीत पेन्शन व्याजासह देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत . यामुळे सदर याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment