Good News : कर्मचाऱ्यांच्या NPS पेन्शन बदलास सरकार तयार ! वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन !

Spread the love

National Pension Scheme : पेन्शन योजनेबाबत सरकारने केले मोठे वक्तव्य! शासकीय कर्मचाऱ्यांना आता लवकरच मोठी दिलासादायक , आनंदाची बातमी मिळणार आहे . पेन्शन योजनेच्या विषयावर आता राज्यामध्ये वातावरण चांगलेच तापलेले आहे. या वातावरणाकडे लक्ष देता केंद्र सरकारने एक महत्त्वाचे वक्तव्य पेन्शन योजनेवर केले असून त्याबद्दल आजच्या लेखांमध्ये आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

National Pension Scheme :

राज्यामध्ये जुन्या पेन्शन योजनेवरून आंदोलन मागील काही दिवसांपासून सुरू आहे. नवीन पेन्शन योजना ही 2004 पासूनच राज्यभरात सर्वत्र राबवली जाईल असा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला असून लागू केलेली नवीन योजना ही बंद करावी अशी मागणी शासकीय कर्मचारी मागत असून सर्व शासकीय कर्मचारी त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.

संसदेमध्ये जुन्या पेन्शन योजनेबाबत तीव्र संवाद निर्माण झाले. सत्ताधारी पक्षाला विरोधकांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत पुन्हा एकदा धारेवरच धरले. अशा मध्ये आता केंद्र सरकारने पेन्शन योजनेच्या विषयी एक महत्त्वाचे वक्तव्य केले असून राज्यभरातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची व महत्त्वाची बातमी मिळेल.

ही समिती काय काम करणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः संसदेमध्ये याबाबत वक्तव्य करत असताना असे सांगितले की, वित्तसचिवांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करण्यात येईल. जी नव्याने राबवण्यात आलेल्या नवीन पेन्शन योजनेचा आढावा घेईल. केंद्रीय अर्थमंत्री यांनी संसदेमध्ये गदारोळ होत असताना विविध वित्त विधेयक मांडले आहेत. अशावेळी सर्वच अडचणी असल्याने लोकसभेने त्या मंजूर केले आहेत. आता सर्वात विशेष बाब सांगायची झाली तर जुनी आणि नवीन पेन्शन योजना याची काही फायदे पण आहेत आणि याची काही तोटे पण आहेत.

काय आहे नवीन आणि जुन्या पेन्शनमध्ये फरक ?

जुन्या पेन्शन योजनेमध्ये ज्या ठिकाणी शासकीय कर्मचारी असतील ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पगाराच्या जवळपास 50 टक्के रक्कम ही त्यांना पेन्शन म्हणून देण्यात येथे. जुन्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांची पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मूळ वेतनावर व तात्कालीन महागाईच्या आकडेवारीवर अवलंबून असते. यासोबतच या पेन्शन योजनेमध्ये कर्मचारी यांच्या पगारामधून एकही पैसा कापण्यात येत नाही.

इतकेच नव्हे तर जेव्हा शासन नवीन वेतन आयोग राबवत आहे. तेव्हा पेन्शन मध्ये सुद्धा वेगाने वाढ होऊ शकते नवीन पेन्शन योजनेच्या माध्यमातून सर्वच कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा पगाराच्या दहा टक्के यासोबतच डीए देखील घेतला जात आहे. सरकार सुद्धा तितकेच रक्कम देत आहे.

कर्मचारी विषयक, भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Comment