महा सन्मान निधी योजना : आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार 12,000/- रुपये सन्मान निधी अर्थसंकल्पांमध्ये मोठी तरतूद !

Spread the love

केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना राबविण्यात येथे , या योजनेनुसार देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये इतका सन्मान निधी मिळतो . केंद्र शासनाच्या या धर्तीवर राज्य शासनाने देखील नमो शेतकरी महासन्माननिधी योजना राबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे .

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री कृषी सन्मानित योजना अंतर्गत 6000 रुपये मिळत आहेत . आता यामध्ये वाढ होणार असून , आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये सन्मान निधी मिळणार आहे . यामध्ये राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजना अंतर्गत आणखीन सहा हजार रुपये मिळणार आहेत .

केंद्र सरकारच्या कृषी सन्मान निधी योजना व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना अशा दोन्ही योजनांच्या मिळून राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 12,000/- सन्माननिधी प्राप्त होणार आहे . या निधी अंतर्गत राज्यातील 1.15 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे . यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर 6900 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे .

Leave a Comment