राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागु करणारच नाही ! हे केवळ मतांसाठीचे राजकारण – अजित पवार .

Spread the love

सन 2005 नंतर सेवेत रुजु होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी याकरीता कर्मचाऱ्यांकडुन वारंवार मागणी होत आहे. परंतु आत्तापर्यंत राजकर्त्यांकडुन केवळ आश्वासनेच मिळाले आहेत . यावर राज्य सरकारकडुन कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही .जुनी पेन्शन हा मुद्दा केवळ मत मिळविण्याचे साधन ठरले आहेत .

यावर राज्याचे विरोधी पक्षनेते यांना विचारले असता , त्यांनी  सांगितले कि , विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षांने जुनी पेन्शन लागु करु असे खोटे आश्वासने दिलेले होते .कारण जुनी पेन्शन लागु करणे , राज्य सरकारला शक्य नाही .कारण यावर सन 2005 पासुन चर्चा सुरुच आहे .यावर आत्तापर्यंत ठोस निर्णय लागलेलाच नाही .यामुळे जुनी पेन्शन हा मतांसाठीचे राजकारण झालेले आहे .

विधानपरिषदेच्या निवडणुका महागाई / बेरोजगारीमुळे जिंकल्याचा दावा

मिडीया रिपोर्टनुसार स्पष्ट झालेले आहे कि , विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला जुनी पेन्शन या मुद्द्यावर यश मिळालेले आहे .परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार ही गोष्ट मान्य न करता , महागाई / बेरोजगारी या मुद्द्यावंर महाविकास आघाडी सरकारला यश मिळाले आहे असे स्पष्टीकरण पत्रकारांशी बोलताना दिले .

यामुळे राज्यातील कर्मचारी वर्गांमध्ये नाराज दिसुन येत आहेत , कारण राज्यातील कर्मचारी वर्गांनी उघडपणे महाविकास आघाडी सरकारला जुनी पेन्शन या मुद्द्यांवर पाठिंबा दिलेला होता . यामुळे महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार मोठ्या मताधिक्यांने विजयी झाले .

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment