बक्षी समिती खंड -2 अहवालास अखेरची मंजुरी ! आता राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार सुधारित वेतनश्रेणीनुसार वाढीव पगार !

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगामध्ये अनेक त्रुटी आढळुन आलेल्या होत्या . या त्रुटी दुर करण्यासाठी राज्य शासनाकडुन मा.बक्षी समितीची स्थापना करण्यात आलेली होती . या समितीने सदर वेतनत्रुटीवर अहवाल तयार करुन राज्य शासनास सादर केला होता .हा अहवाल अनेक दिवस प्रलंबितच होता .

परंतु शिंदे – फडणवीस सरकारने सदर बक्षी समिती खंड – 2 अहवाल स्विकारला आहे .या अहवालातील सर्व बाबी राज्य शासनाकडुन विचारात घेवून सदचा खंड लागु करण्यात येणार आहेत . सहाव्या वेतन आयोगानुसार अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सातव्या वेतनात त्रुटी आढळल्या होत्या . या त्रुटींचे निराकरण या अहवालात करण्यात आलेले आहेत .

बक्षी समिती खंड -2 अहवालानुसार समान पद – समान वेतन हे सुत्र घेण्यात आलेले आहेत . म्हणजेच विविध विभागांमध्ये कार्यरत असणारे समान पदांना समान वेतनश्रेणीमध्येच वेतन अदा करण्यात येईल . जेणेकरुन वेतनातील त्रुटींचे निराकरण होईल . तसेच वर्ग – अ मधील समान काम -समान वेतन त्याचबरोबर अतिरिक्त पदभार याकरीता अतिरिक्त वेतनाची देखिल तरतुद यामध्ये करण्यात आलेली आहे .

या बक्षी समिती खंड – 2 अहवालास राज्य शासनाकडुन अखेरची मंजुरी देण्याची काम सुरु असून , लवकरच याबाबत राज्य शासनाकडुन अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतन व वेतनत्रुटीमधील फरक देखिल मिळणार आहे .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment